मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता समान संधी उपलब्ध करणे गरजेचे- मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, माझी सिद्धकन्या...माझा आत्मसन्मान अभियानाचा जि,प. मध्ये शुभारंभ.

मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता समान संधी उपलब्ध करणे गरजेचे- मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,  माझी सिद्धकन्या...माझा आत्मसन्मान अभियानाचा जि,प. मध्ये शुभारंभ.

-----------------------------------------------------------------------------------

सोलापूर( पंढरी नगरी न्यूज ) माझ्या गावातही मला एवढी छोटीसी मुलगी काय करणार असे विचारत होते पण आज मी स्वतः आय.ए.एस.होऊन माझी स्वतःची ओळख निर्माण केली आणि मुलींमध्ये क्षमता आहे हे दाखवून दिले याचा मला निश्चितच अभिमान आहे म्हणून आज समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महिला व बालकल्याण विभागाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या बोलत होत्या. उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता  ) अमोल जाधव ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,  जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ.संतोष नवले , जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे , कार्यकारी अभियंता बांधकाम संतोष कुलकर्णी , नरेंद्र खराडे , शिक्षणाधिकारी ( नियोजन ) सुलभा वठारे , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तज्ञ डॉ.मुश्ताक शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गाडेकर आदी उपस्थित होते.
   
यावेळी प्रास्तविकामध्ये प्रसाद मिरकले म्हणाले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे म्हणून त्यांनी केलेल्या महान कार्यामधून काही अंशी उतराई होणेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सोलापूर यांचे वतीने माझी सिद्धकन्या... माझा आत्मसन्मान... हा अनोखा उपक्रम सुरू करणेत आलेला आहे.आज प्रत्येकाचे घर असणे हे एक स्वप्न असते आणि त्या घरावर आपल्या आधी आपल्या मुलींच्या नावाची पाटी लावण्याचा उद्देश आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मांडलेल्या महिला धोरणामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याबाबत सूचित केले असल्याचेही सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेमध्ये मुलगी असणाऱ्या खाते प्रमुख अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुलीच्या नावाची पाटीचे वितरण करण्यात आले.
    
यावेळी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद मुख्यालयातील कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, विवेक लिंगराज , अनुपमा पडवळे, शिवानंद मगे व सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.संयुक्ता पाटील व पर्यवेक्षिका शोभा तडलगी यांनी केले.सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ सहायक सचिन आंबेकर , परमेश्वर पांचाळ , अमिता वसेकर ऋषिकेश जाधव आणि श्रीकांत मेहेरकर यांनी प्रयत्न केले.