भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मोठ्या राजकीय बंडाच्या तयारीत, थेट मोदी- शहांना आव्हान देणार
---------------------------------------------------------------------------------
मुंबई (दै.पंढरी नगरी न्यूज) : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन करून मोदी-शहांना आपल्या ताकदीची वसुंधरा राजे यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपमधील त्यांचा कट्टर विरोधक गट सुद्धा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या राजकारणात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया हे कट्टर विरोधक मानले जातात. किरोरी लाल मीना यांच्याशी संबंध बिघडत आहेत. यामुळेच भाजप पक्षनेतृत्व मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर न करण्याच्या भूमिकेत असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता अधिक वाढत आहे.
एकीकडे वसुंधरा राजे यांना बगल देत, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या नावाखाली स्थानिक पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ यांच्या नावाने निवडणूक लढवण्याची चर्चा करत आहेत. तरीही वसुंधरा राजे यांनी ताकद दाखवून आपली मोदी शहांना घाम फोडला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण भाजपचा रस्ता सोपा नाही. दुसरीकडे, मोदी-शहांना जुन्या चेहऱ्यांच्या आधारे चालवायचे नाही आणि राज्यस्थान त्यांना स्वतःच्या मुठीत ठेवायचं आहे. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये स्थानिक चेहरामोहरा बदलून मोदींनी त्यांच्या हो ला हो म्हणणारे नेते महत्वाच्या खुर्चीवर बसवले आहेत. तेच मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये करायचं आहे.
नड्डा यांच्या बैठकीत खुर्च्या रिकाम्या विशेष म्हणजे जेव्हा अमित शहा जाधेपूरमध्ये सभा घेण्यासाठी आले होते. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत रामदेवरा यात्रा काढणार होते. केंद्रीय संघटनेच्या सांगण्यावरून ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. यानंतर पूनिया यांनी एकट्याने पायी प्रवास करत पक्षाला वेगळा संदेश दिला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले - एकला चालो. राजस्थानच्या राजकारणात पूनिया हे वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नड्डा यांनी जयपूरयेथून जनआक्रोश यात्रेच्या रथांना हिरवा झेंडा दाखवला होता. भाजपमधील फूट आणि नेत्यांमधील कलहाचा परिणाम असा झाला की नड्डा यांच्या आगमनाच्या काही मिनिटे आधी मंडपाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. नेत्यांनी गर्दी जमवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला दिसत नव्हता. त्यामुळे केंद्रीय नैतृत्वाला वसुंधरा राजे यांच्या राजकीय ताकदीची चुणूक पाहायला मिळाली होती.
वसुंधरा राजे आणि पूनिया एकमेकांना जाहीर इशारे देतं आहेत राजस्थान भाजपमधील गटबाजी इतकी टोकाला गेली आहे की, केंद्रीय मंत्री शेखावत, पुनिया आणि वसुंधरा राजे अनेकदा एकाच व्यासपीठावर एकमेकांना इशाऱ्याने लक्ष्य करत आहेत. २०१९ सालानंतर एकच प्रसंग आला जेव्हा हे चारही नेते एका व्यासपीठावर एकत्र बसले होते. मात्र, त्यांच्या एकत्र बसण्याचे कारण पंतप्रधान मोदी होते. १२ फेब्रुवारीच्या सभेपूर्वीच किरोड़ी मीणा यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर पणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण भाजप संघटनेला कोंडीत उभे केले होते. पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित करण्यात सतीश पूनिया अपयशी ठरल्याचे किरोड़ी लाल यांचे म्हणणे आहे. करून दिली आहे.