शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी चार हजार कोटी वितरित होणार...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी चार हजार कोटी वितरित होणार...

"""""""""""""”""""""""""""""""""""""”""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

सोलापूर प्रतिनिधी : राज्यातील २३.१४ लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. त्यांना तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहेत. ८ लाख २९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे.

त्यात सोलापूर जिल्ह्यातील ४२ हजार ६४७ शेतकरी आहेत. त्यांना जवळपास २०० कोटी रुपये मिळणार आहेत.

दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना १८ ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित केली जाईल. १८ जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्याने तेथील जवळपास १४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते.

शिंदे-फडणवीस सरकारने आता २०१७ ते १८, १८ ते १९ आणि १९ ते २०२० या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाईल. ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जवळपास १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच...

यंदा बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २१ जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मदत म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक व सततचा पण ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे.